मेक इन इंडिया-आपला इतिहास काय सांगतो?
सध्या मुंबईत मेक इन इंडियाची धामधूम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायापुढे भारतीय उत्पादन क्षमतेचा उत्सव साजरा करून जगभराच्या निरनिराळया उद्योजकांनी भारतात येऊन आपल्या उत्पादनाची निर्मिती करावी, अशी भूमिका तयार करणे हा मेक इन इंडियाचा उद्देश आहे. आज भारत आणि चीन पुन्हा एकदा आर्थिकदृष्टया महत्त्वाचे देश ठरू लागले. परंतु हे चक्र पूर्ण झाले, असे म्हणता येत नाही. भारतातल्या स्वातंत्र्योत्तर आर्थिक विकासामध्ये उत्पादन क्षेत्राचा टक्का अजून तरी नगण्य आहे. उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेला बळ येणार नाही. खरे तर 'मेक इन इंडिया'चा या परिप्रेक्ष्यात विचार व्हावा.